Maharashtra Board Solutions for Class 9- Marathi Kumarbharati (Part- 3): Chapter 14- आदर्शवादी मुळगावकर
Maharashtra Board Solutions for Class 9- Marathi Kumarbharati (Part- 3): Chapter 14- आदर्शवादी मुळगावकर

Class 9: Marathi Kumarbharati Chapter 14 solutions. Complete Class 9 Marathi Kumarbharati Chapter 14 Notes.

Maharashtra Board Solutions for Class 9- Marathi Kumarbharati (Part- 3): Chapter 14- आदर्शवादी मुळगावकर

Maharashtra Board 9th Marathi Kumarbharati Chapter 14, Class 9 Marathi Kumarbharati Chapter 14 solutions

Questions and Answers

1. योग्य उदाहरण लिहा:

प्रश्न 1.

उत्तर:

प्रश्न 2.
योग्य उदाहरण लिहा:

उत्तर:

2. आकृती पूर्ण करा:

प्रश्न 1.

उत्तर:

प्रश्न 2.

उत्तर:

3. खाली काही उदाहरणे दिली आहेत. या उदाहरणावरून मुळगावकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे तुम्हांला जाणवलेले पैलू लिहा:

प्रश्न (अ)


उत्तर:

प्रश्न (आ)

उत्तर:

4. वैशिष्ट्ये लिहा:

प्रश्न 1.
वैशिष्ट्ये लिहा:

(अ) लंडनच्या स्थापत्य विषयाची पदवी –
(आ) टेल्कोचा पुण्यातील कारखाना –
(इ) टेल्कोची परंपरा –
(ई) टेल्कोची मालमोटार –
उत्तर:
(अ) लंडनच्या पदवी परीक्षेच्या अभ्यासक्रमात पुस्तकी शिक्षण होतेच; शिवाय, प्रत्यक्ष कारखान्यात काम करावे लागे. मगच पदवी मिळत असे.
(आ) टेल्कोचा पुण्यातील कारखाना : उत्पादन व व्यवस्थापन या दोन्ही दृष्टींनी कारखाना पहिल्या दर्जाचा आहे, हा लौकिक मिळाला.
(इ) टेल्कोची परंपरा : सर्व दर्जाचे व्यवस्थापक कारखान्यात रोज फेरी मारत असत, ही टेल्कोची परंपरा होती.
(ई) टेल्कोची मालमोटार : टेल्कोची मालमोटार पहिल्या दर्जाची बनली व त्यात सतत सुधारणा होत गेली.

5. खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.

(अ) मुळगावकर अबोल प्रवृत्तीचे होते.
(आ) मुळगावकर पदवी घेऊन आले, तेव्हा भारतात मंदीची लाट होती.
(इ) मुळगावकरांचे जीवन असमाधानी नव्हते.

6. अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.

(अ) प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे यश वारंवार आजारी पडत होता.
(आ) शेतीत खूप कष्ट केल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले.
(इ) आवाक्याबाहेरचे काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले.
(ई) स्वत:च्या तत्त्वांशी समझोता करणे योग्य नव्हे.
(अ) पाठात उल्लेख असलेल्या चिनी म्हणीतील विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. (आ) टेल्कोच्या मालमोटारीच्या ड्रायव्हरशी संवाद साधण्यामागे मुळगावकरांचे कोणते हेतू असावेत, असे तुम्हांस वाटते?

7. स्वमत.

प्रश्न (अ)
पाठात उल्लेख असलेल्या चिनी म्हणीतील विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर:

माणसे आपल्या भविष्याची तरतूद करून ठेवतात. ही तरतूद वेगवेगळ्या स्वरूपांत असते. पैशाच्या स्वरूपातील मदत फार मुळगावकरांनी सामाजिक कार्ये केलेली क्षेत्रे – उपयोगाला येत नाही. झाडे लावली, तर दरवर्षी फळाफुलांचे उत्पन्न मिळते. लाकूडही निर्माण होते. झाडांचा हा असा दरवर्षी नियमितपणे शेती शिक्षण आरोग्य फायदा होतो. मात्र, कोणत्या झाडांचा कधी, कसा व किती फायदा घ्यायचा, हे माणूसच ठरवतो. म्हणून माणूस चांगला घडलेला असेल, मुळगावकरांचे छंद – तर त्याला स्वत:ला या गोष्टीचा फायदा होतोच; शिवाय त्याच्या कुटुंबालाही होतो.

अशी व्यक्ती खूप कर्तबगार निघाली, तर त्या छायाचित्रण कला झाडे लावणे व्यक्तीचा अखंड समाजालाही फायदा होतो. म्हणून पैसे साठवून मुळगावकरांच्या छंदांची फलश्रुती ठेवण्यापेक्षा झाडेझुडपे लावली, तर त्यांचा माणसांना उपयोग होणारच. पण त्याहीपेक्षा माणसे घडवली, तर त्याचा खूप उपयोग होतो. म्हणजे त्यांनी काढलेली त्यांनी लावलेल्या माणसे तयार करणे, हा मानवी समाज घडवण्याचा मार्ग आहे. चिनी छायाचित्रे इतकी सुंदर आहेत झाडांनी पुण्याचा परिसर ई म्हणीमध्ये नेमके हेच सांगितले आहे. की त्यांची प्रदर्शने भरू अत्यंत नयनमनोहर शकतात.

प्रश्न (आ)
टेल्कोच्या मालमोटारीच्या ड्रायव्हरशी संवाद साधण्यामागे मुळगावकरांचे कोणते हेतू असावेत, असे तुम्हांस वाटते ?
उत्तर:

मालमोटारीचा ड्रायव्हर देशभर विविध प्रदेशांत हिंडत असतो. तो कधी जंगलातून प्रवास करतो, तर कधी वाळवंटी प्रदेशातून. उंचसखल प्रदेश, सपाट प्रदेश, दलदलीचा प्रदेश, अतिथंडीचा प्रदेश, प्रचंड पाऊस कोसळणारा प्रदेश अशा विविध प्रकारच्या परिसरांतून आपली मालमोटार प्रवास करीत असते.

अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परिसरांतील वातावरणात आपली मालमोटार कशी चालत असेल? काही अडचणी निर्माण होत असतील का? मोटारीच्या स्वरूपात उणिवा राहिल्या असतील का? अशा प्रश्नांची उत्तरे ड्रायव्हरांशी केलेल्या संवादातून मिळतात. गाडीत काही उणिवा असतील तर त्या दूर करता येतात. आपली मोटार अधिकाधिक निर्दोष करण्याची संधी मिळते.

उपक्रम:

प्रश्न 1.
तुमच्या परिसरातील लघुउद्योजकांची मुलाखत घ्या.

भाषाभ्यास:

हस्व दीर्घ लेखनाबाबतचे नियम:

प्रश्न 1.
खालील शब्द वाचा.

कुस्ती, मुक्काम, पुष्कळ, शिस्त, दुष्काळ, पुस्तक, चिठ्ठी, डुक्कर, बिल्ला, चिक्की.
वरील प्रत्येक उदाहरणात एक जोडाक्षर आहे. या जोडाक्षरयुक्त अक्षरापूर्वीच्या अक्षराचे नीट निरीक्षण करा. काय आढळले? या अक्षरांतील उकार, इकार हे -हस्व आहेत.

मराठी शब्दांत जोडाक्षर असल्यास जोडाक्षरापूर्वीचे इकार, उकार, सामान्यतः हस्य असतात.

लक्षात ठेवा: तत्सम शब्दांतील जोडाक्षरापूर्वीचे इकार व उकार न्हस्व व दीर्घ अशा दोन्ही प्रकारचे आढळतात.
उदा., पुण्य, तीक्ष्ण, पूज्य

वर दिलेल्या वर्णनानुसार किमान दहा शब्द लिहा.

प्रश्न 2.
खालील शब्द वाचा.

चिंच, लिंबू, बिंदू, तुरुंग, उंच, लिंग, अरविंद, अरुंधती, दिंडी, पिंड, किंकाळी, चिंता, पिंड, पुरचुंडी, पुंगी, धुंद, चिंधी
वरील शब्द अनुस्वारयुक्त आहेत. यांतील अनुस्वारयुक्त अक्षराकडे नीट पाहिल्यास काय जाणवते ?
शब्द मराठी असो वा तत्सम. अनुस्वारयुक्त अक्षरे -हस्व आहेत.

मराठी व तत्सम शब्दांतील इकारयुक्त व उकारयुक्त अक्षरांवर अनुस्वार असल्यास सामान्यत: ती हस्य असतात, म्हणजेच ह्या अनुस्वारयुक्त अक्षरातील इकार, उकार -हस्व असतात. वर दिलेल्या वर्णनानुसार किमान दहा शब्द लिहा.

Additional Important Questions and Answers

उतारा क्र. 1

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:

उत्तर:

प्रश्न 2.
कोण ते लिहा:

1. होऊन गेलेल्या बातमीवर अथवा घडामोडीवर परखड भाष्य करणारा.
2. समाजमनावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारा.
उत्तर:
1. संपादक
2. समाजमनस्क व्यक्तिमत्त्व.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
उत्तर लिहा:
संपादकाचे आवश्यक गुण:

  1. बहुश्रुतता
  2. ………………..
  3. ………………..

उत्तर:

  1. संपादकाचे आवश्यक गुण:
  2. बहुश्रुतता
  3. चिकित्सक विचार

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:


उत्तर:

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
‘फॅक्ट्स आर् सेक्रेड बट कॉमेंट्स आर् फ्री’ या उक्तीचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
उत्तर:

वृत्तपत्रांनी बातमी देणे हे त्यांचे मूळ कर्तव्य आहे. वाचकांना आपल्या अवतीभवती, देशविदेशात घडणाऱ्या घडामोडी जाणून घेण्यात रस असतो. वृत्तपत्रांनी बातमीच्या रूपात या घडामोडींची माहिती दयायची असते. ही बातम देताना घटना जशी घडली तशी बातमीत ती आली पाहिजे. बातमीदाराने स्वत:चे विचार, कल्पना बातमीत मिसळू नयेत, अशी अपेक्षा असते. बातमीदाराने आपल्या आवडत्या राजकीय पक्षाची बातमी भरभरून दिली, तर तो त्या पक्षाचा प्रचार होईल. वाचकांना मात्र संबंधित घटना खऱ्या स्वरूपात कळणार नाहीत. हे गैर आहे.

थोडक्यात बातमीदाराने, पत्रकारांनी बातमीत भेसळ करता कामा नये. यालाच ‘फॅक्ट्स आर् सेक्रेड’ असे म्हटले आहे. पत्रकारांना स्वत:चे विचार, मते मांडायची असतील, तर ती त्यांनी अग्रलेखात मांडावीत. स्वतंत्र लेख लिहून मांडावीत. मात्र ही मतेसुद्धा तटस्थपणे व परखडपणे मांडली पाहिजेत. पत्रकारांना ते स्वातंत्र्य पूर्णपणे बहाल केलेले असते. यालाच ‘कॉमेंट्स आर फ्री’ असे म्हटले आहे.

उतारा क्र. 2

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
कोष्टक पूर्ण करा:

कृतीतुम्हांला जाणवलेले गुण
पहिले 6 महिने विनावेतन काम केले आणि नंतर काही काळ अत्यल्प वेतनावर काम केले.

उत्तर:

कृतीतुम्हांला जाणवलेले गुण
पहिले 6 महिने विनावेतन काम केले आणि नंतर काही काळ अत्यल्प वेतनावर काम केले.चिकाटी व कामावरील निष्ठा

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
वैशिष्ट्ये लिहा:

1. मंदीच्या काळातील नोकऱ्या.
उत्तर:
1. मंदीच्या काळातील नोकरीत सुरुवातीला काही महिने विनावेतन काम करावे लागे व नंतर काही काळ अत्यल्प वेतन मिळत असे.

प्रश्न 2.
कोण ते लिहा:

1. टाटा कंपनीत येण्याचे मुळगावकरांना आमंत्रण देणारे.
2. ध्येयाच्या बाबतीत अजिबात तडजोड न करणारे.
उत्तर:
1. जे. आर. डी. टाटा
2. सुमंत मुळगावकर.

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
तुम्हांला जाणवलेले मुळगावकरांचे मोठेपण समजावून सांगा.
उत्तर:

मुळगावकरांनी शास्त्र शाखेची पदवी घेतली होती. पुढे ते लंडनला गेले आणि त्यांनी स्थापत्यशास्त्राची पदवी घेतली. त्या काळाचा विचार करता, हे खूप उच्च दर्जाचे शिक्षण त्यांनी मिळवले होते. लेखकांनी सांगितलेला आदर्शवाद जोपासण्याचा मुळगावकरांचा गुण यातून दिसून येतो. जे करायचे ते उत्तमच, हा त्यांचा ध्यास या कृतीतून दिसतो. उच्च शिक्षण घेतलेले असूनही त्यांना सुरुवातीला 6 महिने विनावेतन काम करावे लागले. या परिस्थितीने ते खचले नाहीत. निराश झाले नाहीत. अत्यल्प वेतनावरही त्यांनी काम केले. यातून त्यांची चिकाटी दिसते. आपल्या ध्येयाकडे जाताना येईल त्या संकटाला तोंड दयायची त्यांची तयारी होती.

या सर्व काळात मुळगावकरांनी आपली योग्यता सिद्ध केली होती. म्हणूनच सिमेंटचे अधिक कारखाने उभारण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोप-अमेरिकेत तंत्रज्ञांचे एक मंडळ तत्कालीन सरकारने पाठवले. त्यात मुळगावकरांचा समावेश होता. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्या मंडळात जे. आर. डी. टाटांसारखा दूरदृष्टीचा उदयोजकही होता. टाटांनी त्या प्रवासातच मुळगावकरांना टाटा कंपनीत येण्याचे आमंत्रण दिले. या घटनांवरून मुळगावकरांच्या मोठेपणाची सहज कल्पना येऊ शकेल.

उतारा क्र. 3

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
उत्तर लिहा:
सलग बारा वर्षे मालमोटारींचे उत्पादन न करण्यामागील रहस्य:
उत्तर:

सलग बारा वर्षे मालमोटारींचे उत्पादन न करण्यामागील रहस्य: मुळगावकरांना केवळ कारखाना उभारायचा नव्हता; तर त्यांना एक उदयोग उभारायचा होता.

कृती 3 : (स्वमत अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
मुळगावकरांची दिसून येणारी व्यवस्थापनातील दूरदृष्टी व कौशल्य समजावून सांगा.
उत्तर:

साधारणपणे बहुसंख्य उदयोजक भराभर उत्पादन तयार करतात आणि बाजारात आणतात. या घाईमुळे उत्पादनात दोष राहतात. कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांनाही एक वाईट सवय लागते. उत्पादनात उणिवा दिसल्या तरी तिकडे दुर्लक्ष करण्याची सवय लागते. अचूक काम करण्याची, काटेकोरपणे काम करण्याची इच्छा राहत नाही. उत्तम दर्जा हवा, हा आग्रहही हळूहळू राहत नाही. अशी कंपनी कधीही पहिल्या दर्जाची होऊ शकत नाही. म्हणून मुळगावकरांनी प्रथम उत्पादनावर भर दिला नाही. मूलभूत बाबी निर्माण करण्यावर भर दिला. याचा टेल्को कंपनीला फार मोठा फायदा झाला. यातच मुळगावकरांची दूरदृष्टी होती व कौशल्य होते.

उतारा क्र. 4

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
मुळगावकरांचे स्वभावविशेष लिहा.

  1. ………………………..
  2. ………………………..
  3. ………………………..
  4. ………………………..

उत्तर:
मुळगावकरांचे स्वभावविशेष:

  1. सौम्य प्रवृत्ती
  2. मोजके बोलणे
  3. आस्थेवाईकपणा
  4. टापटीपपणा.

प्रश्न 3.
विधाने पूर्ण करा:

1. आपल्या कारखान्याला आदर्श करायचे असेल, तर …………………………….
2. आपल्या कारखान्याचे हित कशात आहे, हे लक्षात घेतले, तर ………………………….
उत्तर:
1. आपल्या कारखान्याला आदर्श करायचे असेल, तर कठोरपणे निर्णय घेणे आवश्यक असते.
2. आपल्या कारखान्याचे हित कशात आहे, हे लक्षात घेतले, तर कठोर निर्णय घेणे सोपे जाते.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
पुढील घटनांचा परिणाम लिहा:

घटनापरिणाम
1. मुळगावकर दौऱ्यावर असताना टेल्कोची मालमोटार दिसल्यास ते ती थांबवत आणि ड्रायव्हरशी बोलत.
2. कारखान्याचे अध्यक्ष व अन्य अधिकारी कामगारांत मिसळत.

उत्तर:

घटनापरिणाम
1. मुळगावकर दौऱ्यावर असताना टेल्कोची मालमोटार दिसल्यास ते ती थांबवत आणि ड्रायव्हरशी बोलत.मोटार चांगली चालते का, काही अडचणी येतात का, इत्यादी माहिती मिळे.
2. कारखान्याचे अध्यक्ष व अन्य अधिकारी कामगारांत मिसळत.विचारांची देवाण-घेवाण होत असे.

प्रश्न 2.
विधाने पूर्ण करा:

1. ………………….. ही मोटार उदयोगाला मुळगावकरांनी दिलेली देणगी होय.
2. आपले उत्पादन अधिकाधिक सरस व्हावे, म्हणून ……………………….
उत्तर:
1. अनेक तंत्रज्ञ शिकून तयार झाले, ही मोटार उद्योगाला मुळगावकरांनी दिलेली देणगी होय.
2. आपले उत्पादन अधिकाधिक सरस व्हावे, म्हणून मुळगावकरांनी संशोधन विभागावर लक्ष केंद्रित केले.

उतारा क्र. 5

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:


उत्तर:

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती :

1. समास:

प्रश्न 1.
पुढील विग्रहावरून समास ओळखा:
उत्तर:

  1. हळद, कुंकू वगैरे → समाहार वंद्व समास
  2. पाच मुखांचा समूह → द्विगू समास
  3. राव किंवा रंक → वैकल्पिक द्वंद्व समास
  4. ऋषीसारखा राजा → कर्मधारय समास
  5. देव आणि दानव → इतरेतर द्वंद्व समास

2. शब्दसिद्धी:

प्रश्न 1.
‘उपसर्गघटित, प्रत्ययघटित व अभ्यस्त’- प्रत्येकी दोन है शब्द लिहा.
उत्तर:

उपसर्गघटितप्रत्ययघटितअभ्यस्त
नि:पक्षपातीपत्रकारहळूहळू
प्रक्रियादयावानलालेलाल

प्रश्न 2.
‘ज्ञ’ प्रत्यय लागलेले चार शब्द लिहा : जसे-तंत्रज्ञ.
उत्तर:

  1. शास्त्रज्ञ
  2. तत्त्वज्ञ
  3. शिल्पज्ञ
  4. मनोज्ञ

प्रश्न 3.
‘सद् (सत्)’ उपसर्ग लागलेले चार शब्द लिहा: जसे-सद्वर्तन.
उत्तर:

  1. सद्विचार
  2. सद्विवेक
  3. सदाचार
  4. सद्गुणी

3. वाक्प्रचार:

प्रश्न 1.
अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा:

  1. यशने आहाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो वारंवार आजारी पडत होता.
  2. शेतीत खूप कष्ट केल्यामुळे या वर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले.
  3. आवाक्याबाहेरचे काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले.
  4. स्वत:च्या तत्त्वांशी समझोता करणे योग्य नव्हे.

उत्तर:

  1. यशने आहाराची हेळसांड केल्यामुळे तो वारंवार आजारी पडत होता.
  2. शेतीत खूप राबल्यामुळे या वर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले.
  3. आटोक्यात नसलेले काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले.
  4. स्वत:च्या तत्त्वांशी तडजोड करणे योग्य नव्हे.

प्रश्न 2.
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा:

  1. वाखाणणे
  2. गाजावाजा करणे
  3. प्रेरणा देणे.

उत्तर:

  1. वाखाणणे – अर्थ : प्रशंसा करणे.
    वाक्य: सुधीरच्या चित्राची सरांनी खूप वाखाणणी केली.
  2. गाजावाजा करणे – अर्थ : स्वत:ची टिमकी वाजवणे.
    वाक्य: आपल्या कर्तृत्वाचा गाजावाजा करणे अयोग्य आहे.
  3. प्रेरणा देणे — अर्थ : स्फूर्ती देणे.
    वाक् : राजूच्या समाजसेवेच्या कार्याला आईने खूप प्रेरणा दिली.

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
पुढील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा:

  1. सौम्य प्रकृतीच्या मुळगावकरांना प्रसंगी कठोर निर्णय घेणे शक्य होत असे.
  2. मुळगावकर अबोल प्रवृत्तीचे होते.
  3. मुळगावकर पदवी घेऊन आले, तेव्हा भारतात मंदीची लाट होती.
  4. मुळगावकरांचे जीवन असमाधानी नव्हते.

उत्तर:

  1. सौम्य प्रकृतीच्या मुळगावकरांना प्रसंगी सौम्य निर्णय घेणे शक्य होत नसे. सौम्य प्रकृतीच्या मुळगावकरांना प्रसंगी सौम्य निर्णय घेणे अशक्य होत असे.
  2. मुळगावकर बोलक्या प्रवृत्तीचे नव्हते.
  3. मुळगावकर पदवी घेऊन आले, तेव्हा भारतात भरभराटीची लाट नव्हती.
  4. मुळगावकरांचे जीवन समाधानी होते.

प्रश्न 2.
तक्ता भरा:

एकवचनपदवीदेणगी
अनेकवचनकारखानेमोटारी

उत्तर:

एकवचनपदवीकारखानादेणगीमोटार
अनेकवचनपदव्याकारखानेदेणग्यामोटारी

प्रश्न 3.
कंसांतील योग्य विरुद्धार्थी शब्द निवडून लिहा:

  1. सरस × …………………. (विरस, निरस, सुरस)
  2. सचोटी × ………………. (लबाडी, गुणवान, दुर्गुणी)
  3. अवाढव्य × …………….. (प्रचंड, विशाल, चिमुकले)
  4. सुदैव × ………………… (सदैव, एकमेव, दुर्दैव)

उत्तर:

  1. सरस × निरस
  2. सचोटी × लबाडी
  3. अवाढव्य × चिमुकले
  4. सुदैव × दुर्दैव.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
नियम 1 मध्ये दिलेल्या वर्णनानुसार किमान दहा शब्द लिहा.
उत्तर:

  1. उल्लेख
  2. मुद्दाम
  3. किल्ला
  4. जिल्हा
  5. झिम्मा
  6. कुत्रा
  7. पुत्र
  8. चित्र
  9. दुर्जन
  10. दिल्ली.

प्रश्न 2.
नियम 2 मध्ये दिलेल्या वर्णनानुसार किमान दहा शब्द लिहा.
उत्तर:

  1. इंच
  2. भिंत
  3. कुंडी
  4. शिंग
  5. बिंब
  6. बुंदी
  7. रुंदी
  8. उंदीर
  9. टिंब
  10. पिंप.

प्रश्न 3.
अचूक शब्द ओळखा:

  1. प्रर्दशन, प्रदर्शन, परदर्शन, प्रदशर्न.
  2. केंद्रित, केद्रीत, केद्रित, केंद्रीत.
  3. सलागार, सल्लागर, सल्लागार, सलागर.
  4. चिकीत्सक, चीकीत्सक, चिकिस्तक, चिकित्सक.
  5. बहुश्रुतता, बहुश्रुतता, बहूश्रूतता, बहुश्रूतता.
  6. व्यक्तीमत्त्व, व्यक्तिमत्व, व्यक्तिमत्त्व, व्यक्तीमत्व.

उत्तर:

  1. प्रदर्शन
  2. केंद्रित
  3. सल्लागार
  4. चिकित्सक
  5. बहुश्रुतता
  6. व्यक्तिमत्त्व.

3. विरामचिन्हे:

प्रश्न 1.
पुढील वाक्यातील चुकीची विरामचिन्हे दुरुस्त करून योग्य ती विरामचिन्हे घालून वाक्ये लिहा:

1. तो म्हणाला. मी! तिथे मुळीच येणार नाही,
2. छे, छे, मला नकोच हा वेगळा छंद.
उत्तर:
1. तो म्हणाला, “मी तिथे मुळीच येणार नाही.”
2. “छे! छे! मला नकोच हा वेगळा छंद!”

4. पारिभाषिक शब्द:

प्रश्न 1.
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द दया:

  1. Plumber
  2. Comedy
  3. Magazine
  4. Orientation.

उत्तर:

  1. नळ-कारागीर
  2. सुखात्मिका
  3. मासिक-पत्रिका
  4. उद्बोधन, निदेशन.

उपक्रम:

प्रश्न 1.
तुमच्या परिसरातील लघुउदयोजकाची मुलाखत घ्या.

प्रस्तावना:

गोविंद तळवलकर हे मराठीतील व इंग्रजीतील एक श्रेष्ठ संपादक. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे चिकित्सक अभ्यासक, सामाजिक व राजकीय घडामोडींवर अधिकारवाणीने भाष्य करणारे व्यासंगी पत्रकार. इंग्रजी वाङ्मय, जागतिक राजकारण, विशेषतः रशियन राज्यक्रांती व रशियाची जडणघडण यांचा सखोल अभ्यास हे गोविंद तळवलकरांचे खास वैशिष्ट्य. पुरोगामी दृष्टिकोन, खोलवर चिकित्सा, नि:पक्षपाती भूमिका व धारदार लेखणी यांमुळे वृत्तपत्रसृष्टीत त्यांचा जबरदस्त दरारा निर्माण झाला होता. राजकारणी लोकांना त्यांचा खूप धाक वाटत असे. त्यांनी राजकारण्यांवर नैतिक अंकुश ठेवण्याचे काम केले.

गोविंद तळवलकरांनी विविध प्रकारचे लेखन केले आहे. अनेक कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा परिचय करून देणारे लेखही त्यांनी लिहिले आहेत. प्रस्तुत ‘आदर्शवादी मुळगावकर’ हा पाठ अशाच प्रकारातला आहे. श्री. सुमंत मुळगावकर हे टाटा समूहातील टेल्को या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. एखादी कंपनी स्थापन करायची आणि तिला नफा मिळवून दयायचा, एवढाच मर्यादित हेतू त्यांनी मनात बाळगला नाही. जे काही करायचे ते सर्वोत्तम, आदर्शच असले पाहिजे, असा त्यांचा ध्यास होता.

कंपनीच्या इमारतीची रचना कशी करायची, कर्मचाऱ्यांना कसे घडवायचे, उत्पादन प्रक्रिया कशी आखायची, अंतिम उत्पादन ग्राहकस्नेही कसे करायचे या सर्व बाबतीत ते आदर्शवादीच होते. यामुळे टेल्को कंपनीने संपूर्ण भारतात एक उत्कृष्ट कंपनी म्हणून लौकिक मिळवलाच; शिवाय, जागतिक पातळीवरही ‘उत्कृष्ट कंपनी’ असा शिक्का प्राप्त केला. अशा या सुमंत मुळगावकर या व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा व स्वभावगुणांचा परिचय या पाठात गोविंद तळवलकरांनी करून दिला आहे.

शब्दार्थ:

  1. परखड – स्पष्ट, कोणाच्या दडपणाखाली न येता व कोणालाही खूश करण्याचा हेतू न बाळगता व्यक्त केलेले (मत, विचार इत्यादी).
  2. बहुश्रुतता – खूप ऐकलेले, पाहिलेले, वाचलेले असणे.
  3. समाजमनस्क – समाजाविषयी जागरूक मन असलेला.
  4. आदर्श – आरसा; एखादी गोष्ट, तत्त्व, विचार यांची सर्वोत्कृष्ट अवस्था.
  5. सचोटी – प्रामाणिकपणा, प्रांजळपणा.
  6. निकडीचे – (निकडतातडी, ताबडतोबीची गरज) तातडीचे.
  7. अवाढव्य – प्रचंड.
  8. सौम्य – मृदू, कोमल.
  9. हेळसांड – हयगय, दुर्लक्ष.

टिपा:

1. फॅक्ट्स आर् सेक्रेड, बट कॉमेंट्स आर् फ्री: ‘गार्डियन’ या जगप्रसिद्ध वर्तमानपत्राचे हे घोषवाक्य. फॅक्ट्स म्हणजे घटना, घडलेली गोष्ट. वर्तमानपत्राने घटना घडली, तशीच तिची बातमी दिली पाहिजे. बातमीत स्वत:ची मते, पूर्वग्रह, हेतू मिसळता कामा नयेत. जसे घडले तसे शोधून काढून प्रसिद्ध केले पाहिजे. वर्तमानपत्राची ही नीती असली पाहिजे. भगवद्गीता, बायबल, कुराण यांसारख्या धर्मग्रंथांतील वचने, त्यांतील शब्द हे पवित्र मानले जातात. त्यांत बदल करता कामा नये. त्यांची मोडतोड करून वेगळी रचना करता कामा नये. त्या ग्रंथांत मुळात जसे आहे, तसेच उद्धृत केले पाहिजे, असा दंडक असतो. या अर्थाने बातमीसुद्धा पवित्र असते. तिच्या पावित्र्याला धक्का लावता कामा नये. मात्र त्या बातमीवर, बातमीतील घटनांवर भाष्य करण्याचा संपादकांना अधिकार असतो. असा एकूण त्या घोषवाक्याचा अर्थ आहे.

2. मंदीची लाट: कोणत्या तरी कारणाने एखादे उत्पादन खपत नाही किंवा त्याचे पुरेसे उत्पादन होत नाही. त्यामुळे नफा कमी होतो. साहजिकच पगारकपात केली जाते किंवा नोकरभरती होत नाही किंवा नोकरकपात केली जाते. याचा परिणाम म्हणून लोकांच्या हातात कमी पैसा येतो. पैसा कमी असल्याने बाजारात मालाचा उठाव होत नाही. त्यामुळे संबंधित उदयोगाचा नफा कमी होतो. नोकरकपात होते. पुन्हा मागणी कमी होते… अशा रितीने हेच चक्र वेगाने चालू होते. बेकारी येते. उत्पादन थंडावते. समाजाची आर्थिक स्थिती डबघाईला येते. या स्थितीला ‘मंदी’ म्हणतात.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

  1. कस लागणे – सामर्थ्य सिद्ध होणे, गुणवत्ता सिद्ध होणे.
  2. मानवंदना देणे – आदरपूर्वक सन्मान करणे.
  3. कटाक्ष असणे – आग्रह असणे.
  4. जीव तोडून काम करणे – शरीराला कितीही त्रास झाला तरी त्याची पर्वा न करता कष्ट करणे, पराकोटीचे कष्ट करणे.
  5. गाजावाजा होणे – अवाजवी प्रसिद्धी होणे.

Download PDF

Maharashtra Board Solutions for Class 9- Marathi Kumarbharati (Part- 3): Chapter 14- आदर्शवादी मुळगावकर

Download PDF: Maharashtra Board Solutions for Class 9- Marathi Kumarbharati (Part- 3): Chapter 14- आदर्शवादी मुळगावकर PDF

Chapterwise Maharashtra Board Solutions Class 9 Marathi Kumarbharati :

Part- 1

Part- 2

Part- 3

Part- 4

FAQs

Where do I get the Maharashtra State Board Books PDF For free download?

You can download the Maharashtra State Board Books from the eBalbharti official website, i.e. cart.ebalbharati.in or from this article.

How to Download Maharashtra State Board Books?

Students can get the Maharashtra Books for primary, secondary, and senior secondary classes from here.  You can view or download the Maharashtra State Board Books from this page or from the official website for free of cost. Students can follow the detailed steps below to visit the official website and download the e-books for all subjects or a specific subject in different mediums.
Step 1: Visit the official website ebalbharati.in
Step 2: On the top of the screen, select “Download PDF textbooks” 
Step 3: From the “Classes” section, select your class.
Step 4: From “Medium”, select the medium suitable to you.
Step 5: All Maharashtra board books for your class will now be displayed on the right side. 
Step 6: Click on the “Download” option to download the PDF book.

Who developed the Maharashtra State board books?

As of now, the MSCERT and Balbharti are responsible for the syllabus and textbooks of Classes 1 to 8, while Classes 9 and 10 are under the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE).

How many state boards are there in Maharashtra?

The Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education, conducts the HSC and SSC Examinations in the state of Maharashtra through its nine Divisional Boards located at Pune, Mumbai, Aurangabad, Nasik, Kolhapur, Amravati, Latur, Nagpur and Ratnagiri.

About Maharashtra State Board (MSBSHSE)

The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education or MSBSHSE (Marathi: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ), is an autonomous and statutory body established in 1965. The board was amended in the year 1977 under the provisions of the Maharashtra Act No. 41 of 1965.

The Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education (MSBSHSE), Pune is an independent body of the Maharashtra Government. There are more than 1.4 million students that appear in the examination every year. The Maha State Board conducts the board examination twice a year. This board conducts the examination for SSC and HSC. 

The Maharashtra government established the Maharashtra State Bureau of Textbook Production and Curriculum Research, also commonly referred to as Ebalbharati, in 1967 to take up the responsibility of providing quality textbooks to students from all classes studying under the Maharashtra State Board. MSBHSE prepares and updates the curriculum to provide holistic development for students. It is designed to tackle the difficulty in understanding the concepts with simple language with simple illustrations. Every year around 10 lakh students are enrolled in schools that are affiliated with the Maharashtra State Board.